नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा केंद्र सरकारने केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंदर्भातील माहिती अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून दिली. तसेच लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे स्थापन करण्याचा निर्णय हा विकसित आणि समृद्ध लडाख बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी घेतल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लडाखमध्ये आता जस्कार, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग असे पाच नवीन जिल्हे स्थापन करण्याची घोषणा गृहमंत्री अमित शाह यांनी केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक्सवर पोस्ट करत लडाखच्या लोकांचे अभिनंदन केले आहे.
लडाखमधील जस्कार, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे नवीन जिल्हे आता प्रशासनाला बळ देतील आणि लोकांसाठी फायद्याचे ठरतील. मोदी सरकार लडाखमधील लोकांसाठी मुबलक संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे अमित शाह यांनी एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटले आहे.
लडाखमध्ये आधी होते दोन जिल्हे
जम्मू-काश्मीरपासून लडाख २०१९ मध्ये वेगळे करण्यात आले. त्यामुळे लडाख एक नवीन केंद्रशासित प्रदेश बनला. त्यावेळी या केंद्रशासित प्रदेशात लेह आणि कारगिल हे दोनच जिल्हे होते. मात्र, आता लडाखमध्ये जस्कार, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या पाच नव्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.