काडी पेटी ही घरोघरी दैनंदिन वापरातील एक महत्त्वाची वस्तू आहे. सध्याचा जमान लायटरचा आहे. लायटर कितीही वापरले तरी काडी पेटीची दैनंदिन गरज आहे. त्यामुळे काडी पेटीचे महत्त्व आहे. त्यामुळे काडी पेटीचा इतिहास वाचायला प्रत्येकाला आवडेल. सध्या एका काडी पेटीची किंमत २ रुपये आहे. यापूर्वी २००७ मध्ये काडी पेटीची किंमत वाढली होती. त्यावेळी ५० पैशांची काडी पेटी १ रुपयाला झाली. किंमत वाढविण्याचा निर्णय शिवकाशी येथील ऑल इंडिया चेंबर ऑफ माचीसने घेतला. त्यानंतर आता काडीपेटीची किंमत २ रुपये झाली आहे.
१८९५ साली भारतात काडी पेट्यांची निर्मिती सुरु झाली होती. काडी पेटीचा पहिला कारखाना हा अहमदाबाद आणि त्यानंतर कोलकाता येथे सुरु झाला. स्वीडनमधील मॅच मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने भारतात मॅच मॅन्युफॅक्चरिंग कंपनी उघडली.
१९५० मध्ये किंमत ५ पैसे
-भारतात १९५० साली एका काडी पेटीची किंमत फक्त ५ पैसे होती. जी १९९४ मध्ये ५० पैशांपर्यंत वाढली. त्यानंतर २००७ मध्ये किंमत ५० पैशांवरून १ रुपये करण्यात आली.
काडीपेटीत ५० काड्या
विशेष म्हणजे प्रत्येक काडी पेटीत ५० काड्या असतात. काडी पेटी तयार करण्यासाठी १४ प्रकारचा कच्चा माल लागतो. ज्यामध्ये लाल फॉस्फरस, मेण, कागद, स्प्लिंट्स, पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फरचा वापर केला जातो.
तामिळनाडूत मोठा उद्योग
भारतातील सर्वात मोठा काडी पेटीचा उद्योग तामिळनाडूत आहे. तामिळनाडूतील शिवकाशी, विरुधुनगर, गुडियाथम आणि तिरुनेलवेली ही मुख्यत: उत्पादन केंद्रे आहेत. सध्या भारतात काडी पेटीच्या अनेक कंपन्या आहेत. बहुतेक कारखान्यात अजूनही हाताने काम केले जाते तर काही कारखान्यांत मशीनच्या साहाय्याने आगपेटी तयार केली जाते.
तामिळनाडूत ४ लाख लोकांना रोजगार
तामिळनाडूमध्ये सुमारे चार लाख लोक या उद्योगात काम करतात. यातील ९० टक्क्यांहून अधिक कर्मचारी महिला आहेत.
१८९५ मध्ये काडीपेटीचे उत्पादन
भारतामध्ये काडी पेटीचे उत्पादन १८९५ मध्ये सुरू झाले. त्याचा पहिला कारखाना अहमदाबाद आणि नंतर कोलकाता येथे सुरू झाला. स्वीडनमधील मॅच मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने भारतात मॅच मॅन्युफॅक्चरिंग कंपनी उघडली.
१८२७ मध्ये काडीचा शोध
३१ डिसेंबर १८२७ रोजी ब्रिटनमध्ये जगात पहिल्यांदा काडीचा शोध लागला. याचा शोध लावणा-या जॉन वॉकर या शास्त्रज्ञाने काडी तयार केली होती. जी कोणत्याही खडबडीत पृष्ठभागावर घासल्यास जळू शकते.
काडी पेटीवर फॉस्फरसचा वापर
काडी पेट्यांवर फॉस्फरस लावला जातो. फॉस्फरस हा अत्यंत ज्वलनशील रासायनिक घटक आहे. तामिळनाडूतील पहिला आगपेटीचा कारखाना १९२२ मध्ये शिवकाशी शहरात सुरू झाला. पूर्वी पांढरा फॉस्फरस वापरला जात होता. यावेळी काडी जळत असताना निघणारा धूरही अत्यंत विषारी होता. नंतर पांढ-या फॉस्फरसच्या वापरावर बंदी घालण्यात आली.