१६ जानेवारी : छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक

yongistan
By - YNG ONLINE

१६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजीराजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.  समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ आणि न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांचे निधन. भारतीय वंशाची कल्पना चावला दुस-या अंतराळ प्रवासासाठी आजच्या दिवशी रवाना झाली. बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचेही याच दिवशी निधन झाले. 

१६८१ :  छत्रपती संभाजीराजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला
छत्रपती संभाजी राजे हे मराठा सम्राट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी होते. त्यावेळी मराठ्यांचा सर्वात शक्तिशाली शत्रू मुघल सम्राट औरंगजेब याने भारतातून विजापूर आणि गोलकोंडाची सत्ता संपुष्टात आणण्यात मोठी भूमिका बजावली. १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला. त्यामुळे १६ जानेवारी हा दिवस संभाजीराजे राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. 

१९०१ :  न्यायमूर्ती  महादेव गोविंद रानडे यांचे निधन
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ रोजी झाला. ते ब्रिटिशकालीन भारतीय न्यायाधीश, लेखक आणि समाजसुधारक होते. रानडे यांचा जन्म महाराष्ट्रातील नाशिकमधील निफाड या छोट्याशा गावात झाला. मात्र, त्यांचे सुरुवातीचे आयुष्य कोल्हापुरात गेले. वयाच्या चौदाव्या वर्षी मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांचे शिक्षण सुरू झाले. १८७३ मध्ये त्यांची बॉम्बे प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट, बॉम्बे स्मॉल कॉज कोर्टाचे चौथे न्यायाधीश नियुक्ती करण्यात आली. १८९३ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.  त्यांचे निधन १६ जानेवारी १९०१ रोजी झाले.   
१९३८ : प्रख्यात बंगाली कादंबरीकार शरतचंद्र चट्टोपाध्याय यांचे निधन
सरतचंद्र चट्टोपाध्याय  यांचा जन्म १५ सप्टेंबर १८७६  रोजी झाला. ते बंगाली कादंबरीकार आणि लघुकथा लेखक होते. १६ जानेवारी १९३८ रोजी त्यांचे निधन झाले. 
१९५४  :  चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे निधन 
बाबूराव पेंटर यांना एक उत्कृष्ट चित्रकार आणि शिल्पकार म्हणून ओळखले जात. त्याचबरोबर भारतीय चित्रपटसृष्टीत यांनी मोलाची कामगिरी बजावली. चित्रकला, चित्रपटनिर्मिती, चित्रपटदिग्दर्शन, रेखाटन, शिल्पकला, प्रकाशचित्रण या वेगवेगळ््या क्षेत्रात त्यांनी एक वेगळाच ठसा उमटवला. 

१९९२ : भारत आणि ब्रिटनमध्ये प्रत्यार्पण करार
अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय समुदायातील प्रत्येक देश आर्थिकदृष्ट्या इतर देशांवर जास्त प्रमाणात विसंबून आहे. सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या मार्गावर असल्यामुळे एका देशात आर्थिक गुन्हा केला असेल तर त्याचा परिणाम दुस-या देशावरही होतो. त्यामुळे ज्या व्यक्ती एका देशातून आर्थिक गुन्हे करून पळून जातात अशा गुन्हेगार व्यक्तीला त्या देशांनी तात्काळ मायदेशी पाठवले पाहिजे. कारण हा प्रकार प्रत्येक देशाबाबत घडू शकतो. विशेषत:, ब्रिटेनसारखा देश तर गुन्हेगारांचे नंदनवनच बनत चालला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्यापर्णासाठी वर्षानुवर्ष लागतात. १९९२ मध्ये इंग्लंड-भारत यांच्यात प्रत्यार्पणाचा करार झाला आणि तो १९९३ मध्ये अस्तित्वात आला.  

२००३ : कल्पना चावलाची दुसरी अंतराळ वारी
भारतीय वंशाची कल्पना चावला दुस-या अंतराळ प्रवासासाठी आजच्या दिवशी म्हणजे १६ जानेवारी २००३ रोजी रवाना झाली. संपूर्ण जग भारतीय मुलीच्या उल्लेखनीय कामगिरीचा साक्षीदार आहे. कल्पना चावलाने अमेरिकेत जाऊन अंतराळवीर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने तिची अंतराळ प्रवासासाठी दोनदा निवड केली. कल्पनाने स्पेस शटल कोलंबियामधून दुस-यांंदा अंतराळात झेप घेतली होती.  दुर्दैवाने हे उड्डाण तिच्यासाठी ठरले. कारण १ फेब्रुवारी २००३ रोजी त्यांचे अंतराळ यान क्रॅश झाले.